माझ्याही शिवबांच एक राज्य होत
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत…सुख शांती समाधान नांदत जिथे
अस ते एक हिंदवी स्वराज्य होत…जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता…न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल
पण अन्याय कुणावर झाला नव्हता…राज्यांचा राज्य कारभार असा होता
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती…स्वतःसाठी सारेच जगतात या जगी
रयतेसाठी जगणारे शिवराय होते…स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी….कितीही गुणगान केले तरी कमीच
प्रदीप खेकारे….
असे अमुचे छत्रपती शिवराय होते…
माझ्याही शिवबांच एक राज्य होत, जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत…
